Friday, April 08, 2011

Puducherry
Me, Vibhor and Vijay


ह्या ठिकाणी काहीतरी लिहीण्याची संधी किंवा वेळ ही तब्बल ३ वर्षांनी येतीये :-), चालायचंच. गेली ३ वर्षे आयुष्यातल्या मोठ्या बदलाशी हातमिळवणी करण्यात गेली. Considering the total life span this seems negligible but as of now it is significant. मध्ये १-२ दा छोट्या छोट्या ट्रिप्स केल्याही पण लिहिण्याजोगं असं फारसं काही नव्हतं  त्यामध्ये आणि माझ्यामते त्या ट्रिप्स नव्हत्याच. ट्रेकला जाउन तर तब्बल ६ वर्ष झाली आहेत. ह्यासगळ्यामुळे जीवाची नुसती घालमेल चालु होती.  छोट्याश्या कारणाने राग अनावर होणे. रस्त्यावर at least १कातरी cab, rickshawवाल्याशी रोज भांडणे असं सुरु झाल्यावर मग वाटलं कि लवकरात् लवकर १ ट्रेक् किंवा ट्रिप झालीच पाहिजे नाहितर मानसिक संतुलन बिघडण्याची दाट शक्यता आहे.  दिवाळीच्यावेळी मस्तं चान्स होता पण बरोबर येण्यासाठी कोणीही तयार नव्हतं आणि उगाच एकटं कुठेही जायचं नाही अशी सक्त ताकिद घरातील सर्व वरिष्ठांनी( अधिकाराने) दिल्याने दगडासारखा घरात बसुन होतो. यावेळी मग लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत जी ट्रिक काम करायची तीच ट्रिक कामी आली. तेव्हा औरंगाबदच्या कडक उन्हाळ्यात घरातुन दुपारी बाहेर खेळायची सरळ सरळ परवानगी मिळत नसे .. त्यात परत दुपारी झोप येण्याचा संबंध नसायचा आणि बैठ्या खेळांशी आपलं आधीपासुनच वाकडं.. मग आईच्या डोक्याशी भुणभुण करायची .. आई रसना पिउ का ? असं दर ५ मिनीटानी विचारणे , भिंतीवर ball मारत बसणे , माळ्यावर चढुन काहीतरी खुडबुड करणे .. मग आपोआप मागच्या अंगणात खेळायला मिळायचं .. तसंच यावेळीही मी बराच त्रासलो होतो आणि मी जाहीर केलं की कोणी येवो न येवो मला माहित नाही मी Pondicherry जाणार. So I had decided to go. I asked few of my friends who I thought may possibly come with me to pondy and each of them had some reason for not coming as it used to be when I was a kid. I got my bike serviced. I didn't use bullet for past 3 months as I didn't want to waste petrol and needed that morally positive feeling. The actual plan was to start using cycle once a week before this trip but the knee didn't recover as fast as I optimistically expected. Now you know how desperate I was for this road trip. I started gathering all the info about this old french colony(Pondicherry) where French is still an official language. After a little googling and the route map I was ready. निघायच्या आदल्यादिवशी आमचे लखनवी नवाब फोन करुन विचारातात " सुना तुम Pondy जा रहे हो" ह्या माणसाला मी १ लाख दिवस आधी मेल पाठवला होता पण हे नवाब ई-मेलवर discussion  करत नाहीत.. ह्याचा परत रुबाब .. उत्तरेच्या लोकांची ही १ गोष्ट भारी असते .. त्यांच्यामध्ये जन्मजातच ही "अकड" असते आता हा मनुष्य कधीकाळी roommate होता त्यामुळे मला त्याची सवय झाली होती. फोनवर साहेब म्हणाले " मेरा लगभग ८८% final है" probably his 88% is equivalent of Barney Stinsen's 83%. अजुन एक कानडीसाहेब म्हणाले "addy बाई वैसे मै भी आ सकता हूं" त्याला थोडं brainwash करुन तयार केलं .. अशा त-हेने ३ लोकं अचानक जमा झाली मी, विभोर(नवाब) आणि विजय . शनिवार २-०४-२०११ ला सकाळी ५ वाजता घरातुन बाहेर पडायचं नक्की झालं.

शनिवार ०२-०४-२०११

सकाळी ४:१५ उठलो आणि नवाबसाहेबसुधा जागे झाले. विजयला फोन केला .. ह्या साहेबाना नुकतीच enlightenment झाली असल्याने ते Gym-protein supplement वरुन प्राणायम आणि meditation अश्य़ा सलमान खान ते बाबा रामदेव ह्या प्रवासात होते. नवाबांना चहाशिवाय सकाळची ध्यानधारणा करता येत नव्हती .. थोडक्यात सकाळी उशीर होणार हे नक्की झाल्याने .. मी माझ्या नेहेमीच्या समयबद्ध मानसिकतेत राहुन चिडचिड करण्याऎवजी शांतपणे जे जे होइल ते ते पहावे ह्या mode मध्ये शिरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मला सकाळी सकाळी चहा मिळाला आणि शिवाय उपाशीपोटी कसं निघायचं ह्या भितीने नवाबांनी तयार केलेले corn-flakes सुधा मिळाले. विजय सकाळी ५ ला विभोरकडे पोचला मीही तयार होउन बसलो होतो विभोरच्या तयारीला अजुन काही(?) वेळ लागणार होता. मग काय विजयने आल्या आल्या TV लावला आणि सकाळी सकळी मोठ्या आवाजात TV लावुन विभोर ला ह्या apt.मधुन कसे बाहेर काढण्यात येइल ह्याचा प्रयत्न सुरु केला.. मग friendsचा १ अख्खा एपिसोड झाल्यावर finally घरातुन बाहेर पडलो. एव्हाना ५:४५ झाले होते.  Trip meter was set and we started towards Hosur road. The newly constructed Hosur road is approx. 12kms long flyover. So once we were on that there was no need to slow down until we reached the toll booth at the end. Vijay was the first to reach the booth, he asked the person on the window to charge for all 3 of us. He took change and moved ahead .. behind him vibhor also started but gate closed and he dashed opened the gate .. and suddenly the alarm started ringing and the guy collecting money shouted "catch him" .. we all were clueless .. what's happening .. I was at the window i told him that Vijay has paid for 3 of us .. he said "no .. only 1 .." this dumb bihari had charged for only one .. I asked him to charge for two(me n vibhor) of us .. but he kept shouting at Vibhor and saying उसे पकडो .. उसने पैसा नही दिया ... and he did the same thing again .. he gave me ticket for 1 ..मग माझं डोकं सरकलं ...गाडीवरुन उतरुन त्याला "सर्व" प्रकारे झाडलं ... idiocracyत दाखवल्याप्रमाणे जगाचा avg. IQ खरोखरच कमी होत असल्याचं दिवसेंदिवस प्रकर्षाने जाणवायला लागलंय. सकाळी सकाळी ईसापच्या गोष्टीप्रमाणे लोक अक्कल परसाकडेला सोडुन येतात कि काय कुणास ठाउक. Finally  matter sort out करुन आम्ही पुढे निघालो. निघताना विजय म्हणाला "addy अपना दिमाग इतना गरम नही करने का सुबह सुबह". मीही स्वत:ला असं ब-याचदा समजवायचा प्रयत्न करतो.. but I always fail to do this. आपल्या इथल्या जवळ जवळ सर्व लोकांना मिळालेला हा वाईट्ट शाप आहे "तेवढ्यानी काय होतं  !!"   .. जरा wrong sideनी गाडी चालवली तर काय होतं .. 2मि. उशिर झाल्यानी काय होतं .. १०रु. ची लाच घेतल्यानी काय होतं... १ दिवस work from home सांगुन काम न केल्यानी काय होतं ... लहानसा बग आहे .. नंतर फ़िक्स करु .. छोटसं फ़िचर आहे .. नंतर चेक करु .. का गोष्टी perfectly करत नाहीत ... हा "चलता है" नावाचा ढिसाळपणा आणि कामचुकारपणा का ? we get to see this stuff everywhere .. even in so called white caller and educated people .... जोपर्यंत हि लोकं company मध्ये असतात तोवर उगाच खोटं खोटं दाक्षिण्य दाखवत असतात .. लिफ़्टमध्ये आधी पुढे जाउ देणे.. बाटलीत पाणी भरत असतील तर बाजुला होऊन ग्लास भरु देणे वगैरे वगैरे पण हीच लोकं जेव्हा कंपनीच्या बाहेर जातात तेव्हा no parkingमध्ये गाडी लावणे .. बायको रस्त्याच्या कडेच्या दुकानात भाजी घेईतोवर रस्त्यात मध्येच गाडी उभी करणे वगैरे शांतपणे करत असतात. as rightly said by one of my friend, these are behaving like cultured people only because somebody who is wise has set the system for these people and these people just know how to follow it. had these ppl been raised in jungles they would have been living not unlike other animals. असो तर असं हे सकाळी सकाळी माझ्या डोक्यात वावटळ निर्माण करुन खिडकीवरले साहेब पुढच्या कामाला लागले होते आणि आम्हीही पुढे निघालो. सकाळचं थंड वारं, मोकळा चौपदरी रस्ता, उन्हाळा असुनही हिरवागार असलेला आजुबाजुचा परिसर ह्यामुळे डोकं शांत होत होतं. होसुरपर्यंतचा रस्ता हा ब-यापैकी रहदारी असलेला आहे. इथुन तमिळनाडु सुरु होतं. डाव्या उजव्या बाजुला वेगवेगळ्या कंपन्यांचे प्लांट्स आहेत. अशोक लेलॆंड आणि टीव्हीएस सुधा बघितल्यासारखं वाटतंय. ह्याच रस्त्यानी (NH-7) पुढे कृष्णगिरीपर्यंत जायचं. कृष्णगिरीच्या जवळ पोचायला लागल्यावर आजुबाजुला छोटे छोटे डोंगर दिसायला लागतात. आजपर्यंतच्या केलेल्या ट्रिप्सपैकी ही माझी पहिलीच ट्रिप होती ज्यात मी उगवत्या सुर्याच्या दिशेला निघालो होतो आणि तमिळनाडुमध्येसुधा पहिल्यांदाच .. खरं केवढा मोठा देश आहे ..उत्तरेच्या लोकांच्या द्रुष्टीने मुंबई म्हणजे साऊथ .. मराठी लोकांच्या द्रुष्टीने बंगलोर म्हणजे साऊथ पण बंगलोरपासुनही कन्याकुमारी साधारण ८०० कि.मी आहे .. एवढा मोठा देश हा एक देश म्हणुन कसा काय टिकुन राहीला .. आश्चर्य आहे खरोखर. २८ राज्य आणि प्रत्येकाची जवळ जवळ वेगळी भाषा. even after being so densely populated how come so many different languages evolved. भाषांमध्ये साधर्म्य आहे no doubt पण १ माणुस दुसरीकडे जाउन लगेच communicate करण्याएवढही नाहिये आणि ह्याचा प्रत्ययही लवकरच यायला लागला. जसे जसे आम्ही बंगलोर पासुन लांब जात होतो तसा तसा माझा कानडी येत असल्याचा अभिमान गळुन पडायला लागला. म्हणजे १०० किमी च्या आतच एवढा फ़रक ?? जर सपाट मैदानी भूभागाची ही अवस्था तर पुर्वोत्तर राज्यांची काय परिस्थिती  असेल ??? how are we going to connect ?  तसा फ़ार मोठा प्रश्न आहे अश्यातला भाग नाही पण जर त्या भाषा येत असल्या तर bond जास्त strong होइल असं मला वाटतं. माझ्या मते कोणत्याही माणसाशी connect  होण्याचे २ सोपे पर्याय म्हणजे १. त्या व्यक्तिची भाषा  किंवा २. त्याचे आवडते अन्न :-) .. not funny, it really works .... शाळेतल्या मुलांना indo-aryan भाषेबरोबरच indo-dravidian आणि ते मुंडा लोक जे होते त्यांची भाषा(tibeto-burman ?) निवडण्याचा पर्याय असतो का ? नसला तर असायला पाहिजे... at least ह्यापैकी १ तरी भाषा यायला पाहिजे. आणि भाषा ह्या लहानपणीच पटकन शिकता येतात कारण तेंव्हा आपला मेंदू एवढा साचेबद्ध आणि logical झालेला नसतो .. जे आहे ते लक्षात ठेवायचं उगाच - हे असंच का?,  मग त्या भाषेत तर असं नाही,  छ्या ! ह्या भाषेला काही नियमच नाही वगैरे अडमुठेपणा यायच्या आत. असो .. तर मजल दर मजल करत .. मध्येच थांबुन डोंगराआडुन वर येणारा सुर्य पहात आम्ही २ तासात कृष्णगिरीला पोचलो. कृष्णगिरीला  पोचलो. कृष्णगिरीला पोचल्यावर NH-7 वरुन डाविकडे वळुन NH-46 घ्यायचा आणि २०० मिटरवर लगेच उजवीकडे वळुन NH-66 घ्यायचा. निघायच्या आधी अनिकेतनी हा रस्ता खराब आहे असं सांगितलं होतं, त्यामुळे मनाची तयारी होती. actually कृष्णगिरी पासुन साधारण ३०किमीचा रस्ता हा खुप खराब आहे पण त्यापुढचामात्र तसा चांगला आहे. रस्ता छोटा आहे पण तशी रहदारीसुधा कमी आहे फ़क्त १खादी बस जर समोर असली तर irritate व्हायला होतं. खड्डे चुकवत आणि चुकुन १खाद्या खड्ड्यात गाडी गेलीच तर गाडीची माफ़ी मागत साधारण ११ वाजता टळटळीत दुपारी तिरुवन्नमलईला पोचलो. ही सगळी तशी छोटी गावं आहेत. तशीच तिथली hotels सुधा छोटी त्यामुळे नवाबांच्या पसंतीस १ही hotel उतरेना आणि विजयची परिस्थीती अगदी लहान मुलासारखी. दुपार झाली भुक लागणार .. भुक लागली लग्गेच खायला पहिजे .. नाहीतर तोंड केविलवाणे करणे .. वाटेत कुठेतरी नाहिसे होणे .. "बाई glucose की कमी मेह्सुस हो रही है" वगैरे dialogue सुरु होतात :-) .. शेवटी १ ठिक्ठाक hotel सापडलं. गेल्यावर इडली वडा order केलं .. आणुन दिल्यावर पाहतो तर काय .. ४इडल्या आणि १ वडा.. हि ह्यांची १ प्लेट. पण तेवढ्यावर भुक भागणार नव्हती म्हणुन ३ डोसे सांगितले .. पहिला डोसा आणल्यावर बघुनच आम्ही गार .. ३-४ डोस्यांएवढा तो १ डोसा होता .. १ डोसा cancel करुन आम्ही मोर्चा पेयांकडे वळवला .. प्रत्येकी ३-४ बाटल्या(कोक आणि मिरिंडा उगाच चावट अर्थ काढु नये) रिचवल्या. ह्या सगळ्याचे बिल बंगलोरपेक्षा अर्धे आले. हे सगळं ह्यासाठी कि जेव्हा केव्हा असल्या ठिकाणी जाल तेव्हा आधि quantity बघणे आणि मग order करणे. तिरुवन्नमलईपासुन परत चांगला रस्ता सुरु होतो. तिरुवन्नमलई ते तिंडिवनम हा रस्ता साधारण चांगला आहे .. पण तिंडिवनम ते pondicherry हा रस्ता awesome आहे .. म्हणजे लै भारी आहे .. ६ पदरी रस्ता, रहदारी जवळजवळ शुन्य, टळटळीत दुपारची वेळ .. आणि जवळजवळ १ ते १.५ किमीपर्यंतची clear visibility.. मग काय बराच वेळ लगाम लावलेल्या आमच्या गाड्या तुफ़ान उधळल्या .. ९० च्या खाली यायचं कामंच नाही.. आणि गाड्याही कुठल्या तर electra, thunderbird आणि pulsar 220. अर्धा तास सतत असं चालवल्यावर engineची थोडी दया आली आणि गाड्या सावलीला लावल्या. तिथुन निघाल्यावर साधारण १५ मि मध्ये पुदुचेरीला पोचलो. आता महत्वाचे काम म्हणजे राहण्याची जागा शोधणे आणि एव्हाना फ़ायनल मॆच सुरु व्हायची वेळ झाली होती. Lonely  planet च पुस्तक उघडुन १केका हॊटेलचा नं. फ़िरवायला सुरुवात केली. माझा अंदाज असा होता की world cup final आणि जाळणारा उन्हाळा ह्यात कोण येणार .. पण अंदाज साफ़ चुकतोय अशी उत्तरं फोनवर मिळायला सुरुवात झाली. finally ginger ह्या महागड्या hotelमध्ये रहायची जागा होती. आता पुढचा प्रश्न ginger शोधणे .. थोडी फ़िराफ़ीर झाल्यावर शेवटी तो लाल बोर्ड दिसला .. एव्हाना विषुववृत्तिय उन्ह ६ तासांचा प्रवास ह्यामुळे दोघेही वैतागले होते पण gingerच्या एसी मध्ये शिरल्यावर हाSSSSयसं वाटलं... पुढचा प्रोग्राम काय तर match :-) .. खाली already बरेच लोक CCD च्या loungeमध्ये मॆच बघत होते .. आम्हीही सामील झालो .. जरा उन्ह कमी झाल्यावर बाहेर पडलो ते थेट beach road ला पोचलो. ह्या रस्त्यावर गाड्यांना परवानगी नाही... हा रस्ता म्हणजे साधारण १किमी चा समुद्राकाठचा रस्ता .. इथे beach असा नाहिये .. मुंबईच्या marine drive सारखा पण छोटा .. वाहनांचा गोंगाट नसलेला .. संध्याकाळी चालायला येणारे लोक .. आमच्यासारखे प्रवासी .. आणि अर्थातच्या खायच्या पदार्थांच्या गाड्या. ह्याच रस्त्यावर गांधीजींचा मोठा पुतळा आहे .. समुद्राकडे पाठ करुन .. हे असं का माहित नाही .. पण त्याच बरोबर Dupldiex पुतळा .. फ़्रेंच war memorial  जुने दीपगृह आहे आणि हे माझं भारताच्या पूर्व किनारपट्टीचं पहिलं दर्शन .... बंगालच्या उपसागराकडे पहिल्यांदाच पहात होतो .. १ वेगळंच feeling होतं .. म्म नाहिये सांगता येत .. पण तो सरळ रस्ता .. आजुबाजुच्या फ़्रेंच इमारती .. वसाहतीची असलेली व्यवस्थित आखणी .. सगळं पाहुन जर भारतावर फ़्रेंचांच राज्य असतं तर परिस्थीती बरीच वेगळी आणि चांगली असली असती असं वाटलं. १ तर ते लोक एवढे aggressive/dominating नसावेत .. आणि फ़्रेंचाविरुद्ध उठाव झालेला वाचल्याचं काही माझ्या आठवणीत नाही. तर पुदुचेरी .. पुदुचेरी हा केंद्रशासीत प्रदेश ३ भागांनी मिळुन बनलेला आहे. त्यातला पुदुचेरी हा सगळ्यात मोठा. इतर दोन भाग म्हणजे आंध्रप्रदेशातील यानम आणि केरळमधील माहे. ह्या सगळ्य़ांमध्ये फ़्रेंच ही कार्यालयीन भाषांपैकी १ आहे. स्वातंत्र्यानंतर १९५४ पर्यंत हा भाग फ़्रेंचाच्याच ताब्यात होता ... आणि तेव्हापासुन ते आजतागायत हा केंद्रशासित प्रदेश आहे. फ़्रेंचाच्या भारतात इंग्रजांविरुद्ध २ मोठ्या लढाया झाल्या १ म्हणजे प्लासी आणि दुसरी म्हणजे वांडिवॊशची.. दोन्हीमध्ये फ़्रेंचांनी मार खाल्ला. पण कुठल्यातरी करारानुसार इंग्रजांनी हा भाग फ़्रेंचांना परत दिला. अजुनही इथे फ़्रेंचाची थोडी छाप दिसते. पोलिसांच्या टोप्या, hotels ची नावं वगैरे वगैरे .. hotel च्या नावावर जाउ नये. नुसतं नाव फ़्रेंच पण खाद्यापदार्थ सगळे देशी पद्धतीचे. १ ’ला तेरास’ .. नावाचं hotel आहे तिथला pizza मात्र मस्तं होता .. बहुतेक मालकीणच pizza करते. अतिशय पातळ बेस आणि अतिशय चविष्ट असा पिझ्झा तिथे मिळतो. संध्याकाळी चालत भटकुन आमचे पाय एव्हाना दुखायला लागले होते आणि मॆच पहायची उत्सुकता होतीच. म्हणुन मग हॊटेल वर परत आलो .. मग काय मॆच..शिट्ट्या .. दंगा  etc. etc. करुन .. सकाळी सुर्योदय पहायचा नक्की करुन झोपलो.


रविवार ०३-०४-२०११

Way to Auroville Aashram
सकाळी ५:४५ ला उठलो .. विभोरनी येणार नाही अस आधीच जाहीर केलं होतं.  विजयही प्रयत्न करकरुन उठला तोवर ६:१५ झाले आणि बाहेर बघितलं तर लक्षात आलं कि आपण पुर्व किना-यावर आहोत आणि सुर्योदय लवकर होत असतो ! .. तरीही जाउन येउ म्हणुन बाहेर पडलो. बीच रोडवर पोचलो तेव्हा तिथे सकाळी पळायला/व्यायामाला आलेल्या लोकांची गर्दी होती .. १ माणुस, त्याची एक २ फ़ुटी मुलगी आणि दुसरी २.५ फ़ुटी मुलगी सुर्याकडे पहात व्यायाम करत होते .. फ़ार भारी द्रुष्य होतं ते... १ फ़िरंगी मुलगी बहुदा नुकत्याच झालेल्या द्न्यानप्राप्तीमुळे प्राणायम करत होती .. १ हातात कागद घेउन काहितरी सुचायची वाट बघत असावी .. १ आजोबा वयाच्या मानाने अगदी कठोर परिश्रम करत होते ... बाजुला फ़ुटपाथवर मुलं स्केटिंगचा सराव करत होती .. कोळी मासेमारी करुन किना-याकडे परतत होते .... १दम happy आणि healthy india चित्र दिसत होतं .. मनाला आलेली सगळी मरगळ - थकवा  नाहिसा होईल असं. नवाब त्यांच्या सकाळच्या विधी पुर्ण करुन चहाच्या शोधात किना-याला पोचले होते आणि विजय साहेब त्यांच्या कामासाठी hotel कडे पळाले ..  ह्यांचा मुख्य interest म्हणजे आरामात राहणे .. योग्य वेळी पाहिजे ते खायला मिळणे .. शरिराला कमीत कमी त्रास देउन जे काही झेपेल ते पाहणे :-) ..  उन ब-यापैकी वाढायच्या आत निघुन बिचवर जायचं ठरलं. खोलीवर जाउन सर्व सामान घेउन आम्ही paradise beachच्या दिशेने निघालो... ह्या बीचबद्दल बरच ऐकुन होतो. १का खाडीतुन बोटीने बीचवर घेउन जातात etc.etc. so we were all excited to go there... हा बीच pondyच्या दक्षिणेला ८किमीवर आहे. १का बोटीतुन साधारण १ किमीवर बीच आहे .. पण गेल्या गेल्या मला जोरदार धक्का बसला .. तिथे "Swimming not allowed" अशी पाटी होती .. च्या मारी मग इतक्या लांबच्या बीचवर आम्ही काय शिंपले गोळा करायला आलो होतो ????  @$##@#%$^&$%$**   जरा कुठे गुडघ्यापर्यंतच्या पाण्यात गेलो कि शिट्टी. हा फ़ारच मोठा भ्रमनिरास होता. आलोच होतो म्हणुन थोडं फ़िरुन घेतलं आणि पुढच्या बोटीने परत निघलो. तिथुन direct Auroville beachवर जायचं ठरलं.. एव्हाना १२ वाजले होते आणि हा beach विरुद्ध दिशेला १२ किमीवर होता ..त्यात नवाब साहेबाना बीचवर जाण्यासाठी nikeचीच short हवी होती .. मग बरच शोधुनही ते दुकान मिळेना आणि वेळही जात होता तेव्हा शेवटी आम्ही वैतागुन १ दुकानपाशी थांबलो आणि इथुन घे अस वसकल्यावर नाखुशिने त्याने कपडे घेतले. दुपारी १ वाजता १दाचे त्या Auroville beach ला पोचालो .. आणि पोचताच डोळ्याचे पारणे फ़िटले .. जे पहायची वाट कित्येक दिवस पाहिली ४-४.५शे किमी गाडी चालवली तो निळाशार समुद्र .. त्या किना-यावर येउन फ़ुटणा-या लाटा .. बस बस !!! पाणी पाहिलं कि मला असाच हर्षवायु होतो .. आणि सुदैवाने गर्दीही फ़ारशी नव्हती .. मग काय गाड्या लावुन direct  पाण्यात .. तिथे तसेच साधारण १ तासभर डुंबत होतो .. थोड्या अंतरावर काही मुली होत्या आणि त्यांचा त्यांचा धिंगाणा चालु होता.  तिथुन थोड्या अंतरावर काही मुलं होती mostly south indian आणि त्यांचही असच काहीतरी चालु होतं .. खेळता खेळाता त्या मुलींच्या अगदी जवळ जाउन खेळायला लागली आणि नंतर मग मुलिंकडे पाहुन ओरडणे वगैरे फ़ालतु प्रकार सुरु झाले .. सुरुवातीला मुलींनी दुर्लक्ष केलंही आणि मीसुधा .. पण नंतर ती अजुनच चेकाळली .. मग मात्र मला सहन होईना .... म्हटलं जाउन सरळ १खाददुस-याला धोपटलं तर बाकीचीही गप्प बसतील आधीच प्यायलेली .. स्वत:च ताबा स्वत:वर नाही ... पण मग म्हटलं आपण निघाल्यावर त्या मुलींना जास्तं त्रास दिला तर ?? आपण मध्यमवर्गिय लोक उगाच फ़ार विचार करायला जातो .. त्यामुळेच मध्यमवर्ग हा सगळ्यात कमी एकी असलेला सगळ्यात सहिष्णु .. आणि त्याचमुळे .. १ पुळचट असा समाजवर्ग असल्यासारखा वाटतो .. आणि  सगळ्यात तिरस्करणीय म्हणजे ही असली जनावरं जन्माला कशी काय येतात .. भय निद्रा आहार आणि मैथुन ह्या level ला असलेले हे प्राणीच आहेत, स्त्रियांकडे मादी ह्या गलिच्छ नजरेने बघणारे ... रस्त्यावरच्या कुत्र्यांना जसं sterile करुन त्यान्चे कान कापुन परत सोडतात ना ..ह्यान्नाही तसच करायला पाहिजे. मग काय सरळ निघालो ... म्हटलं मुलींच्या बाजुला जाउन उभं राहु आणि जर का कोणी आजुबाजुला फ़िरकलं तर सरळ हातापाई करु .. तसही collegeमधुन बाहेर पडल्यास अशी संधी मिळालेली नाहिये .. आणि अजुन थोडे दिवस तर आपण एकटे आहोत .. होऊन जाउ देत ..   मी आणि विजय त्या मुलींपाशी गेलो .. पण काय झालं कुणास ठाउक त्यांच्यापैकी कोणी तिकडे आलं नाही ..  आणि १-२ जण जे त्यांच्याजवळ उभी होते तेही निघुन गेले .. त्या मुलीना विचारलं तुमच्या बरोबर कोणी आहे ना ... तर त्यातल्या दोघीनी आमच्याकडेच संशयानी पाहिलं .. त्यातली १ होती ती समजुन हो आहे म्हणाली .. आणि आम्ही परत समुद्रात निघालो .. विजय म्हणाला ’देख मैने बोला नही था .. उन्हे हम भी वैसेही लगेंगे .. कोइ point नही है हेल्प करने मे’ मलाही १ क्षण असंच वाटलं .. पण जर त्याना आजपर्यंत असेच अनुभव आले असतील तर त्या तरी विश्वास का ठेवतील ?? रागामुळे कानातही नाडीचे ठोके ऐकु येत होते .. समुद्राच्या पाण्यात डुंबल्यावर .. नाकातोंडात पाणी शिरल्यावर जरा शांत झाल्यासारखं वाटलं .. डोकं शांत झालं पण समाधानी नाही .. अजुनही एवढ्या मोठ्या पर्यटन स्थळी मुलींना .. बायकांना मनमोकळं राहता येउ नये ?? .. साधारण तास-दोन तास तिथे घालवल्यावर आम्ही hotelवर परत आलो .. आंघोळी उरकुन लगेच .. अरविंद आश्रम बघण्यासाठी निघालो .. जाण्याधी माझं मत काही फ़ारसं चांगलं नव्हतं .. पण ह्या आश्रमाकडे जायचा रस्ताच एवढा मस्तं होता की सगळे विचार आपोआप पवित्र व्हायला लागल्यासारखं वाटलं .. कोकणातले रस्ते असतात ना १दम तसाच होता .. छोटा पण व्यवस्थित रस्ता दुतर्फ़ा दाड झाडी आणि त्या झाडीचा रस्त्यावर असलेला झाडांचा मांडव .. त्या मांडवाच्या जाळीतुन उन्हाने जमीनीवर काढलेली नक्शी .. सगळंच निरागस .. आश्रमात पोचलो तेव्हा संध्याकाळ झालेली होती .. आणि रविवारी आश्रम बंद असल्याने मात्रीमंदीर बघता येणार नव्हते .. म्हणुन मग तिथे थोडा वेळ फ़िरलो आणि १का झाडाखाली बसलो .. लोकं जाइपर्यंत ... आणि हळु हळु सगळं शांत होत होत .. मग पक्ष्यांच्या आवाजाकडे लक्ष जायला लागलं .. कलत्या उन्हाचा स्पर्श जाणवायला लागला .. झाडांचा वास जाणवायला लागला .. खरंतर किती साध्या गोष्टी आहेत ह्या पण रोज एवढी गर्दी असते .. वासांची .. प्रकाशाची .. आवाजांची .. ह्या गोष्टी दबुन जातात .. आपल्या अंतर्मनाला .. intuition ला सुधा शिक्षणाच्या चाकोरीमुळे असंच होत असेल ? ... असावं कदाचित .. त्या सगळ्या वातावरणात शरीरातुन ..छातीतुन काहीतरी खुप प्रयत्न करकरुन बाहेर पडु पाहतंय असं वाटंत होतं .. किंवा बाहेरचं खुप प्रयत्न करुन आज शिरुन पाहत असावं ... आपणच झाड आपणच ह्या झाडांची माती हे वारं सगळं आपणंच असावं असं वाटायला लागलं .. थोडावेळ डोळे मिटुन घेतले .. फ़क्त त्वचेद्वारेही बरंच काही अनुभवता येतं हे जाणंवलं .. पुन्हा एकदा .. जेव्हाही मी डोंगरावर  किंवा जंगलात असतो तेव्हा ही जाणीव होते .. हिरवंगार गवत .. उत्तुंग कडा .. ह्या सगळ्याचा आपण १ अविभाज्य घटक असल्याची .. त्या माचीवरल्या बुधालाही असंच काहीसं वाटलं असणार .. पहिल्यांदा जेव्हा मी ते वाचलं तेव्हा त्याच्या शरीराल्या लागलेल्या मुंग्यांना चिमण्या टिपतायत हे विचित्र वाटलं होतं .. पण आता ते बरोबरच आहे असं वाटलं .. आणि तो बुधा मातीतुन .. झाडातुन .. ते सगळं पहात असणार ...... i was in no mood of perceiving anything else ..  we left ashram on that note and reached hotel for pleasant  and calm night .. 


सोमवार ०४-०४-०५


RaajaagirI fort
सकाळी लवकर उठुन निघायचं ठरलं होतं .. कारण परतीच्या वाटेवर जिंजीचा किल्ला बघायचा होता आणि रणरणत्या उन्हात तो बघणं काही शक्य नव्हतं .. पण लोकांची तशी तयारी नव्हती . .. मग मीही न ताणता ७ वाजता निघु असं म्हटलं .. सकाळी उठुन कोप-यावरच्या दुकानात फ़क्कड चहा प्यायलो .. चहाच्या effectमुळे विभोर लगेच hotel वर गेला .. मी आणि विजय १२ इडल्या आणि २ वडे रिचवुन परतलो .. आश्चर्य म्हणजे एवढ्या सगळ्याचे फ़क्त ५० रुपये झाले .. बंगलोरला ह्याचे कमीत कमी १५० तरी झाले असते. सगळं संपवुन निघायला ८ वाजले. सगळ्यात पहिला patch तिंडीवनम .. आमचा आवडता .. ह्यावरुन सुसाट निघालो. तासाभरात जिंजीला पोचलो. जिंजीचा किल्ला हा राजागिरी पर्वतरांगामध्ये येतो. ह्याच्या आजुबाजुला २ किल्ले आहेत .. १.राजागिरी २. कृष्णगिरी आणि ३. चिक्कलदुर्ग. ह्यातला राजागिरी हा सगळ्यात उंच म्हणजे साधारण ८००फ़ुट आहे. हे तिन्ही किल्ले १मेकाना नैसर्गिकरित्या जोडलेले आहेत त्याच्यावरच तटबंदी बांधलेली आहे. किल्ला अतिशय चांगल्या स्थितीत ठेवला आहे.. even बांधाकाम सुधा डागडुजी करुन व्यवस्थित ठेवलेले आहे.किल्ल्याच्या आसपास बरीच तळी आहेत. राजागिरी ह्या मुख्य किल्ल्यामध्ये ८ मजली कल्याण महाल, व्यायामशाळा, धान्याची कोठारं उत्तम स्थितीत आहेत. किल्ल्याच्या वाटेवर रंगनाथस्वामी मंदीर आहे हेही छान ठेवले आहे. एकंदरीत दक्षिण भारतातली सर्वच ऎतिहासिक स्थळं छान ठेवली आहेत. १०:३० वाजता भर उन्हात आम्ही किल्ला चढायला सुरुवात केली .. माझ्या हिशोबाप्रमाणे १लि. पाण्याची बाटली मी बरोबर ठेवली. पण सुरुवातीच्या १५ मि च्या चढणीमध्येच तो हिशोब साफ़ चुकला असल्याची खात्री पटायला लागली. विभोर ला दर ५मि.नी तहान लागत होती आणि अजुन किती चढायचंय असं तो विचारंत होता .. त्यात परत त्याच्याकडे SLR cameraचं additional ओझं होतं .. मग मी camera माझ्याकडे घेतला .. विजयतर काही ते घेणार नव्हता .. थांबत थांबत पाउण १ तासात वर पोचलो .. वरती मात्र मस्तं वारं वाहत होतं .. उरलं सुरलं पाणी पिउन सावलीत टेकुन बसलो .. वरही ब-यापैकी स्वच्छता होती .. आजुबाजुला लांबलांबपर्यंत शेतं दिसत होती आणि मुख्य म्हणजे एप्रिल महिना असुनही सगळी हिरवीगार होती. वरती १ हवा महालासारखी खोली आहे आणि १ खजिनागृह आहे. थोडी विश्रांती घेउन उतरायला सुरुवात केली .. उन एव्हाना चांगलच तापलं होतं .. सुर्य डोक्यातुन उन्हाचे खिळे जमिनीत मारतोय असं वाटंत होतं कारण डोकं वाईट तापलं होतं आणि पायही जड झाले होते :-) .. खाली पोचलो तेव्हा खालच्या हिरवळीत पाईपनी पाणी सोडलं होतं .. तोंडावर गार गार पाण्याचे सपकारे मारले आणि सावलीला पहुडलो .. घड्याळानी ८वण करुन दिल्यावर निघालो .. आता सगळ्या त्रासदायक प्रकार म्हणजे वाईट रस्ता सुरु होणार होता .. रस्ता सुरु झाल्यावर थोड्या वेळानी त्या खड्ड्यांचा pattern लक्षात यायला लागल्यावर ते चुकवुन गाडीचा वेग maintain करणं जमायला लागलं. आपला मेंदु खरोखर भारी गोष्ट आहे .. it can fit almost everything in a pattern .. 

1. Everything around us can be represented and understood through numbers.
2. If you graph these numbers, patterns emerge. Therefore : There are patterns everywhere in nature.
           -Max Cohen in Pi.

संध्याकाळी ४ च्या सुमारास कृष्णगिरीला पोचलो आणि नि:श्वास  टाकला. आता काय व्यवस्थित चौपदरी रस्ता थेट बंगलोर पर्यंत. रात्री घरी पोचलो तेव्हा सर्व अवयवांनी धन्यवाद दिले आणि मीही त्याना .. मस्तं गरम पाण्यानी आंघोळ केली आणि how i met your mother बघत झोपलो .. :-) ...

Tuesday, June 10, 2008

डेक्कन ओडिसी

बुलेट घ्यायची आणि मनसोक्त भटकायचं अगदी सगळीकडे भटकायचं ही फ़ार लहानपणापासुनची इच्छा .. मोठं झाल्यावर बुलेट हे काही साधं प्रकरण नाही हे कळलं पण म्हणुन लहानपणासुन जपलेलं .. पाहिलेलं स्वप्न असच सोडुन द्यायचं ... शक्यच नाही .. मग हे एवढं काम कशासाठी ..शेवटी येणार येणार म्हणता म्हणता Bullet आली .. तिची पहिली १००० किमी पुर्ण झाली .. बर्रेच दिवस रेंगाळलेला प्रोजेक्ट संपला ..त्यालातर अगदी गाडीत बसवुन पाठवला . so everything was set for one more of the stress busters आणि ह्या पावसाळ्यात फिरण्यासाठी चिकमंगलुरपेक्षा भारी जागा कोणती असणार ... मग त्याच्या आसपासचा भाफ़िरायच नक्की केलं ..
सागर सेठला फोन केला .. हा माणुस कधीही कुठेही यायला १का पायावर तयार असतो .. त्याला फोन केला ..साहेब लगेच जायच्या दिवस आधी हजर. कंपनीत दिवस येणार नाही असं सांगुन टाकलं... आता काय निघायचं बास्स्स्स !!!!

--०८

तारीख थोडक्यात वेडीवाकडी झाली .. असो .. तर आद्ल्या दिवशी सगळी तयारी करुन झाली होती . नेहेमीप्रमाणे सक्काळी :३० ला घरातुनबाहेर पडायचं नक्की केलं. पण नेहेमीप्रमाणे नव्हतंच .. मी गजर बंद करुन खुशाल झोपलो. दोघही लवकर उठण्याच्या मूडमध्ये नव्हतो . शेवटी :३० उठलो आणि साधारण अर्ध्या तासानी घराबाहेर पडलो. तोपर्यंत वाहतुक अगदी जोरदार सुरु झाली होती .. रस्त्यावर ११० तरी trucks १काच वेळेला चालले होते. outer ring rd वरुन नेलमंगलापर्यंत पोचायलाच तासभर लागला ..हा NH-4 वरचा प्रवास .त्यात लोकानी रस्ता दोन्ही बाजुनी खणुन ठेवलेला मेट्रोच्या कामासाठी. सगळा आनंदच एकंदरीत. नेलमंगलाहुन डावीकडे वळल्यावर NH-48 लागतो. ह्या रस्त्यानी थेट हासनपर्यंत जायचं. हा रस्ता अतिशय छान आहे .. तसे कर्नाटकातले सगळेच रस्ते मस्तं आहेत आणि ह्यामुळेच इथे tourism छान develop झालं आहे. आपल्या महाराष्ट्रात काही असं दिसंत नाही अजुन. असो ते विलासराव बघुन घेतील .. आणि मी स्वत: मतदान केलं नाहीये त्यामुळे इथे बसुन शहाणपणा सांगण्याचा काही हक्कंही नाहिये. हा तर .. ह्या रस्त्यावरुन आम्ही निघालो होतो.
this rd is just like a runway ..त्यात परत बुलेटवरची ही पहिलीच ्रिप त्यामुळे आम्ही सुसाट निघालो होतो .. तरी हा रस्ता पदरी नाहिये .. गडगडाट करत बुलेटवरुन असल्या रस्त्यानी जाण्यात काय मजा आहे वा !!! इथे लिहीणं निव्वळ अशक्य .. असं मस्तंवालपणे छातीवर वारं घेत जाणं म्हणजे थेट stallion type वाटंत होतं(नाहिये माहितीये पण वाटण्यात काही चुक आहे का ?) . घोडा हा असा १कच प्राणीआहे जो vegetarian असुनही रुबाबदार दिसतो .. बाकी सगळी म्हणजे अगदीच काहीतरी ..म्हणजे सुंदर दिसु शकतात पण रुबाबदार नक्कीच नाही .. तेच पाहिलं तर सगळे मांसभक्षक कसले देखणे असतात वाघ , सिंह, लांडगे ..etc . त्यातही स्वत: शिकार करुन खाणारे आणि scavengers वेगळे दिसतात .. तरस , गिधाडं किळसवाणी दिसतात पण गरुड, ससाणे रुबाबदार ... माणसाच्या खाण्यावर त्याचा स्वभाव अवलंबुन असतो किंवा त्याचा जसा स्वभाव असतो तसाच त्याचा आहार .. .....
तर रस्त्यावरुन जात असताना आम्ही तसलेच कोणीतरी असल्याचं मनात नक्की झालं होतं आमच्या, निदान माझ्यातरी .. सागर शाकाहारीआहे मंद कुठला ...वाटेत नेहेमीप्रमाणे मस्तं डोंगर दिसला आणि त्यावर १कच ढग होता
volcanic eruption च्या आधी किंवा मध्ये कधीतरी हे असे ढग असतात ना त्याच्या तोंडापाशी तसलंच काहीतरी दिसत होतं.
त्यानंतर १का ठिकाणी काहीतरी खायला म्हणुन थांबलो .. तिथे पोळीच्या आकाराच्या ईडल्या मिरची भजी असं व्यवस्थित खाउन पुढे निघालो ते
direct हासनलाच थांबलो पेट्रोल भरण्यासाठी .. गाडीचं पोट भरुन पुढे चिकमंगलुरच्या दिशेनी निघालो ..ह्या रस्त्यावरतर traffic खुपच कमी आहे ..म्हणजे मला रस्त्याच्या मध्यभागी उभं राहुन हा फोटो काढता येण्याएवढा ..वेड लावणारा रस्ता आहे .. असाच्या असा गुंडाळी करुन घेउन जायचा .. पाहिजे तेव्हा उलगडायचा आणि सुटायचं ..
कानात वारं शिरल्यासारखंच झालं होतं .... generally फ़िरताना मला इतिहास आणि संस्कृती ह्यांची सांगड घालणा-या भागात फ़िरायची आवड आहे. माझ्या काही dream destinations पैकी म्हणजे इस्तंबुल .. खुश्कीच्या मार्गासाठी प्रसिद्ध असणारं ... किती जुनं आणि cultural mixture असणारं शहर असेल ते .. तुर्क , युरोप, अरब , रशियन आणि बरंच काय काय .. तर तिथल्या त्या प्रसिद्ध बोस्पोरस पुलावरुन गाडी चालवणे ही अजुन इच्छा.. तसं म्हटलं तर हे सगळे लोक वेगवेगळे पण काहीतरी साम्य असलेले .. हे आर्यही तिथुनच कुठुनतरी आले असावेत .. the warrior cast .. आपण खरे आर्य नाहीच .. खरंतर भारत ..हा भारत नसुन united states of india आहे असं वाटतं कधी कधी .. तसं बघायला गेलं तर काय साम्य आहे काश्मीरी आणि तमिळ लोकांमध्ये .. ईंग्रजांविरुध्द लढताना १त्र आले म्हणुन भारत .. नाहितर आपला देश हा आपला देश असता ?आतातर ग्लोबलयझेशनमुळे कोण कुठला काय .. सगळंच विरघळल्यासारखं झालंय ..ते जेव्हा खेड्यात पोचेल तेव्हा वेगळं असं काही राहणारंच नाही .. पण तसं व्हायला नको .. ते नैसर्गिक वाटंत नाही .. पण तसं झालंतर आता जेप्रांतिक वाद चालु आहेत ते राहणार नाहीत .. मुळात ही भाषावार प्रांतरचनेची idea मला पटलेली नाहिये .. govt. itself has given reason for the conflict .. तसंच हे cast प्रकरण .. त्यावर तर एवढा काथ्याकुट झालाय की अजुन काही बोलायची गरजच नाहिये ..पण डोकं आपल्या हातात असतं का ? हो दुखायला लागलंकीच असतं .. वरची cast खालची cast हे काय प्रकरण आहे .. race started at the same time for everybody .. nobody was given advantage then .. it was nature who might given something extra to some of the people .. and those outclassed rest of the species .. तर मग हा प्रश्न येतोच कुठे ?? का माणुसकी म्हणुन हे सगळं ?? वाघ सिंहंसाठी आपण अभयारण्य केलीत .. तर त्यानी त्यांनी अजुन जागा मागायला सुरुवात केली तर आपण देणार का ? तसं पहायला गेलं तर हुशार .. नुसतं हुशार असं नाही तर कुठल्याही क्षेत्रात ज्यांना दैवी देणगी आहे त्यांच अस्तित्वच non-blessed speciesसाठी असणारी competition आहे .. भारत हा १कच देश आहे ज्यात मागासपणा prove करण्यासाठी आंदोलन होत असेल .. उद्या जर माकडांसाठी reservation आणलं तर शेपट्या लावुन reservation घ्यायलाही कमी करणार नाहीत लोक .. अरे किती खाली जायचं ...असो तो कही मुद्द नाहिये लिखाणाचा ...
चिकमंगलुरच्या दिशेनी जसं जसं जायला लागलो तसं तसं ढगांची आकशात गर्दी वाढायला लागली .. वाटेत जाताना रस्त्यावरुन कळणारही नाही असं छोटसं धरण लागतं यागची नावाचं .. अतिशय कमी गर्दी ,स्वच्छ पाणी ,थेट भिंतीपर्यंत जायची परवानगी आणि फोटो काढायसाठी मनाई वगैरे काही नाही ..मनसोक्त पाणी बघुन पुढे निघालो .. चिकमंगलुर गावातुन बाहेर पडुन मुल्लायनगिरीच्या रस्त्याला लागलो .. घाटात जसं जसं वर चढायला लागलो तशी तशी हवा थंड होत होती .. दोन्ही बाजुला coffee estates ला जाणारे रस्ते होते .. उंचच्या उंच सरळसोट आकाशाकडे जाणारी झाडं .. हवेला येणारा ओलसर निलगीरीचा वास .. प्रसन्न करणारा होता .. very refreshing .. उगच कविता वगैरे सुचणारा होता .. सागरला मागे पाट्या वाचायला बसवलं होतं पण तो नुसताच प्रेक्षणिय "स्थळं" बघत होता .. मध्ये - दा आम्ही चुकिच्य रस्त्यावरही गेलो पण ते फ़ारतर - kms असेल मग सरळ १का पाटीचा फोटोच काढुन ठेवला प्रोब्लेमच नको . घाटातुन वर जाताना आधी लागतो तो सितलायनगिरी .. ह्या सितलायनगिरीला पोचलो तेव्हा तिथे already 1 bullet उभी होती .. तीही अशीच मस्त दिसणारी :D .. तिथे चक्क शूटींग चालु होतं .. माझ्या आयुष्यातलं पहिलं शूटिंग actress कोण आहे ते लगेच कळत होतं actor काही दिसत नव्हता आणि तसंही त्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं नसतं. कोण actress होती ते काही कळलं नाही पण छान होती बापडी ..१५-२० मि. आम्ही ती काहीतरी शॊट देइल म्हणुन वाट पहात होतो पण तिचा अर्धा वेळ केस आणि चेहेरा ह्यात गेल्यावर शॊट नीट नाही म्हणुन कट .. मग वैतागुन निघालो तिथुन .. मुल्लायनगिरीकडे .. सुरुवातीचा रस्ता चांगला आहे .. पण नंतर रस्ता संपतो आणि मातीचा कच्चा रस्ता सुरु होतो तोही घाटातला .. इथे गाडी खुप सांभाळुन चालवावी लागते. मुल्लायनगिरीला पोचल्यावर खाली गाडी लावुन पाय-यांवरुन वर चालत जायचं .. वरती खुप जोरदार वारं होतं आणि १दम बोचरं .. आम्ही लगेच शिरस्त्राणं चढवली म्हटलं अजुन दिवस आहेत जास्त शहाणपणा नको ... दुपारचे ४ वाजले होते .. आणि समोर कोकणाच्या म्हणजे कर्नाटकातल्या कोकणाच्या बाजुनी ढग इकडे डोंगराकडे यायला .. आमच्या समोर मान्सून घाटमाथ्यावर येत असल्यासारखा .. मागे १दा मायबोलीवर वाचलेल्या कविता ८वली .. संघमित्रा नावाच्या userनी पोस्ट केली होती ..
झाकोळ नभाच्या पार,
क्षितीजावर काजळभार.
मन कुंद होतसे हट्टी,
वा-याची बदले पट्टी.
झुळुकेचा हो सोसाटा,
अन सैरावैरा वाटा.
झाडांचे झडती मुजरे,
अन सावध करती हुजरे.
मेघांची मिरवत माला,
सम्राट ऋतुंचा आला.

simply amazing .. डोळ्यासमोर जे दिसतंय ते शब्दात express करता येतंय .. किंवा कवितेत काहीतरी लिहिलय तेच समोर दिसणं .. एवढं भारी feeling होतं ते .. मला तेही सांगता येत नाही .. आणि त्या कवयित्रीला ते छंदात वगैरे लिहीता आलं .. तिला शि. सा. न.
आता कवितेच्या राज्यातुन सत्य आणि शाश्वतात आल्यावर कळलं की लवकरात लवकर इथुन पळणं भाग आहे नाहीतर त्या मातीच्या रस्त्यावरुन गाडी चालवताना तंतरेल. तिथुन पळतच खाली निघालो. खाली पोचल्यावर पहिल्या २-या gear मधुन गाडी सावकाश चालवली डांबरी रस्त्यावर येईपर्यंत आणि नंतर regular स्पीडनी जायला लागलो पाउस चांगलाच सुरु झाला होता.. घाटातुन काही मुलं-मुली वरती चालत निघाली होती .. पण पावसामुळे त्यांनीही पुढे जायचं रद्द केलं.. १ चांगली जागा शोधुन आम्ही थांबलो .. आणि पावसातले काही फोटो काढले .. वाटेत १का गावाच्या बाजारात विकत घेतलेल्या plasticचा इथे छान उपयोग झाला .. तिथे बसुन आम्ही slice पिलं .. पावसात बसुन slice पिणं हे स्वर्गीय सुखांपैकी १ होतं. संध्याकाळचे ४ वाजले होते म्हणुन मग पुढे बाबा बुडन्गिरी कडे निघालो . हा बाबा बुडनगिरी म्हणजे मंदीर आणि दर्गा असं दोन्ही आहे. ह्या घाटात भरपुर पाउस आणि धुकंही होतं. visibility फ़क्त ५-१० फुट असेल. मग ३०च्या स्पीडनी हळुहळु गाडी हाकत पुढे निघालो. घाटात अजुनही बरेच bikers दिसत होते. प्रत्येक bikeवर १ साजेसा pillion riderही होता. ते पाहिल्यावर साग्या मला विचारतो किती दिवस असं आम्हाला घेउन फ़िरणार ? ह्यावर माझ्याकडे काय उत्तर होतं .. काही नाही फ़क्त १ fact .. आणि त्यामुळेच मी
इथे स्त्रीजातीबद्दल रोष व्यक्त करु इच्छितो .. ही माझी जागा आहे at least इथे मी काहीही करु शकतो. त्याला म्हणालो ..
सायकल झाली,scooter झाली,tvs victor झाली , pulsar झाली आत bulletही झाली काही फ़रक नाही म्हणजे problem हा गाडीचा नाही माणसाचा आहे . तर इथे मी स्त्रीजातीला नमूद करु इच्छितो की माझ्या गाडीचे pillion seat हे काट्याचे नसुन मऊ स्पंजचेच आहे आणि तिथे बसलेलं मला चालतं.
तर ह्या घाटात तुफ़ान थंडी होती. दातांचा ताशातर केव्हाच सुरु झाला होता. थंडी १०० ft per sq cm per sec ह्या स्पीडनी हाडापर्यंत शिरत होती
.. तिथे रहायची काय सोय आहे ह्याचीही काही कल्पना नव्हती. bb hills च्या ४किमी अलिकडे रस्त्याच्या कडेला १ cottage दिसलं. तिथे विचारल्यावर कळलं कि मालक साहेब कुठेतरी गेले आहेत आणि ते काही नजीकच्या भविष्यकाळात इकडे येणार नाहीत. नुसतं थांबण्यापेक्षा बाबु ला जाउन यायचं ठरलं. ते ४ किमी जायला १५ मि.तरी लागली असतील. कधी १दा पोचतो असं झालं होतं. वरती पोचल्यावर काहीही दिसत नव्हतं. म्हणुन आधी रूम शोधुन सामान टाकुन पुढे भटकायचं ठरवलं. पण काही रिकामं नव्हतं. निवारा नाही .. वस्त्र ओली होती.. मग उरलं काय .. अन्न !! १का टपरीवर जाउन गरमागरम चहा घेतला पण हाताला काही जाणवतंच नव्हतं. तोंडाला मस्तं चटका बसला पण ..
तिथली पोटपुजा आटोपुन परत खाली cottage पाशी आलो. तिथे मालक अजुनही आला नव्हता. मागनं अजुनही लोक यायला लागले होते .. मग आम्ही स्वत:च १ रूम उघडुन त्यात सामान ठेवुन टाकलं. मालक आल्यावर बघता येईल. थोड्या वेळात तो बाबा आला .. आणि त्यानी ती रूम आम्हालाच दिली. कधी १दा त्या खोलीत जाउन कोरडे कपडे चढवतो असं झालं होतं. १तर पाउस त्यात थंड बोचरं वारं .. सगळे अवयव बधीर झाले होते. खालच्याच खोलीत कौस्तुभ भेटला .. हा मनुष्य मला वर्षभरापुर्वी badminton tournamentsच्या वेळेला भेटला होता. तो आणि त्याचे मित्र आले होते .. आता नविन अस्तित्वात आलेला प्रश्न म्हणजे रात्रीच्या जेवणाचं काय .. माझीतरी परिस्थीती अशी होती कि आता उपास घडला तरी चालेल पण परत पावसात नाही. पण खालच्या लोकांकडे गाडी नव्हती आणि ४ किमी जाण्यासाठी दुसरा काहीच option नव्हता.
मी माझी नवी गाडी दयायच्या condition मध्ये नव्हतो .. मग काय परत गाडीवरुन वर जाउन खायला काहीतरी आणायचं ठरलं. त्यांच्यातला १ जण बरोबर येणार होता. एव्हाना बाहेर पुर्ण अंधार पडला होता. headlight चालु केला तर तो गाडीचं पुढचं चाक संपायच्या आतच धुक्यात हरवत होता. मग अतिशय concentration नी फ़क्त १० च्या स्पीड नी पहिल्या गिअरमध्ये गाडी चा्लवत वर जाउन खायला घेउन आलो. हा driving मधला सगळ्यात अवघड पार्ट होता. रस्त्याच्या मध्यभागातुन गाडी चालवावी लागत होती. रस्त्याचा मध्यभाग म्हणजेही अंदाजच.
नंतर नंतर हिप्नॊटाइझ झाल्यासारखं वाटत होतं शेवटी १दाचा तो पार्ट संपला. वर येउन मेणबत्तीच्या प्रकाशात कोरडे कपडे घातले .. किती सुख
आहे .. नुसते कोरडे कपडेही सुखाची परमावधी असु शकतात.. आवरुन झाल्यावर आणि खोलीभर ओल्या कपड्यांचा पसारा मांडुन मध्यात बसुन खायाला आणलेल्या रबरी पोळ्या आणि त्याच्याबरोबरचा तो कसलातरी रस्सा खाउन ब्लॆंकेटमध्ये शिरलो .. दिवसभरच्या प्रवासानी दमलो असलो तर रात्री ब-याच गप्पा मारत होतो .. नंतर फ़क्त सागर बोलत होता .. मी काही response देत नाहीये हे त्याच्या ब-याच वेळानी लक्षात आले ... माझा fuse कधीच उडाला होता.

८-०६-०८

सकाळी उठल्यावर मग त्यानी भरपुर शिव्या दिल्या मला ... आता मला काय माहित कि मी कधी झोपणार आहे ते ..
मला सकाळी लवकर जाग आली.. साधारण ६ च्या सुमाराला उठलो .. १ छोटासा video shoot केला आणि सागरला उठवलं.
हा कार्यकर्ता रात्री उठुन अजुन जास्त कपडे चढवुन झोपला होता. सकाळचं आवरुन खोली सोडली. खाली आलो तर लोकं त्या धुक्यात cricket
खेळत होती. खालच्या खोलीतल्या लोकांना टाटा करुन .. पुढे निघालो. सगळ्यात आधी केम्मेनगुंडी आणि मग हेब्बे falls वगैरे plan होता.
सकाळी सागरनी गाडी चालवायला घेतली होती. त्याच्या चालवण्यामुळे मला जाम भिती वाटत होती. पण त्यानी चालवली व्यवस्थित. केम्मेनगुंडीकडे जाताना १ फ़ाटा लागतो त्या फ़ाट्यानी साधारण ८ किमी वर हेब्बे falls आहे. हा रस्ता फ़ार वाईट आहे .. म्हणजे मुळात हा रस्ताच नाहिये .. त्यात पावसानी चिखल आणि निसरडा झालेला ... सरळ असतातर जाताही आलं असतं पण हा घाटातला होता .. hair-pin bends असणारा ..
आणि दरीच्या बाजुला काही railingवगैरेही नाही .. so we canceled the plan to go there and started back towards kemmenagundi .. the rd to kemmenagundi was much better than this. kemmanagundi is like ooty. a nice clean and calm hill station where the road takes u to the topmost of the hillock via nice hair-pin curves and greenest of the plants.सगळीकडे हिरव्या रंगाची उधळण झाली होती. लहान मुलांना रंग शिकवण्यासाठी असल्या ठिकाणी आणलं पाहिजे. हा रंग म्हणजे हिरवा असं जर त्याना शिकवलं तर ती मुलं कधीच विसरणार नाहीत हे. रंग वास आकार हे असेच शिकवले पाहिजेत .. where they really touch ur soul through ur senses. शाळेत चित्रात रंग भरताना हे असं त्यांच्या लगेच डोक्यात येणारंच.
मलातर हिरवा वासही येतो... पावसाळ्यात कुठल्याही डोंगरावर गेलो की येणारा. हे असलं सगळं आजुअबाजुला असलं कि nostalgic व्हायला होतं. लगेच बालभारती .. नविन वह्या पुस्तकांचा वास .. मराठीच्या पुस्तकातल्या छान कविता ..धडे .. नविन uniform सगळं असं ८वायला
लागतं. बाहेर अशी मस्तं पावसाळी हवा असली .. कि आई बाबा किंवा दादा आणि बाबा शाळेत येणार ... मग मास्तरांना सांगुन आम्ही सगळे वेरुळ किंवा दौलताबाद किंवा किमानपक्षी गोगानाथाची टेकडीतरी...मग भिजुन घरी आलं स्वच्छ कोरडे कपडे घालायचे .. generally अश्या वेळी दिवे गेलेले असायचे .. मग मेणबत्तेच्या प्रकाशात .. रामरक्षा गीतेचा १५वा अध्याय अथर्व-शीर्ष .. पाढे , वर्ग घन वगैरे ... म्हणायचं तोपर्य़ंत मस्तं पिठलं किंवा तसलंच काहीतरी आईनी केलेलं असणार ते खाउन गोष्ट ऐकत झोपायचं .. केवढं साधं आणि मस्तं life होतं ..

केम्मेनगुंडी फ़िरुन झाल्यावर परत पोट नावाच्या १ महत्वाच्या अवयवानी ते असल्याची जाणीव करुन द्यायला सुरुवात केली. हॊटेल मध्ये फ़क्त इडल्याच होत्या.. मग इडल्या आणि गुड डे खाउन बाहेर पडलो. next destination was hebbe falls. ह्या धबधब्यानी आमचा व्यवस्थित अपेक्षाभंग केला .. १ मंदीर तिथे छोटासा ओहोळ बास ... तिथे जास्त वेळ न घालवता आम्ही सरळ भद्रा डॆमच्या दिशेनी
निघालो.
हेब्बे फ़ॊल्सहुन घाटाची उतरण सुरु होते. घाटातुन खाली जायाला लागल्यावर ढग कमी कमी होत जातात आणि मग पुढे गेल्यावर तर चक्क उन पडलं होते .. १तर आम्ही सकाळी निघताना आदल्या दिवशीचे ओले कपडे परत चढवले होते कारण आमच्या
जवळ आता फ़क्त १कच कोरडा जोड शिल्लक होता आणि तो emergency म्हणुन ठेवला होता.सकाळच्या थंडीत ते कपडे आणि ओले सॊक्स घालताना प्रचंड जिवावर आलं होतं आणि त्या सगळ्यानंतर आता direct कोवळं उन ..आहाहाहा !!
तिथे लिन्गदहळ्ळी गावाच्या सुरुवातील १का शेतात १ उंचच्या उंच झाड होतं आणि त्याच्यावर कसलीतरी लाल-गुलाबी फ़ुलं होती ..आवडलंच ते १दम. लिंगदहळ्ळीहुन बाहेर पडुन तरिकेरेला जायचं आणि तिथुन पुढे लाकावल्लीला जायचं .. रस्त्यावर

सगळीकडे बोर्ड आहेत आणि हा रस्ताही चांगला आहे. भद्रा डॆमला सुदैवानी अजिबात गर्दी नव्हती. धरण तसं छोटसं आहे ..आणि धरणाचं पाणी खुप स्वच्छ आहे .. जिथे पाणी उथळ आहे तिथे तळही दिसतो. पोहायला अगदी tempting असं

होतं पाणी. निव्वळ आम्ही सतत ओले होतो म्हणुन पाण्यात गेलो नाही नाहीतर नक्की २-४ उड्यातर मारल्याच असत्या.मी लहान असताना
१दा सांगलीहुन गणेशवाडीला गेलो होतो सायकलींवरुन. तिथे १ विहीर होती छानपैकी बांधलेली काळ्या
कातळाची. तिथलं पाणी १दम निळंशार होतं तसलंच होतं ह्या धरणातलं पाणी.तासभर तिथे थांबल्यावर जेवणासाठी लाकवल्ली गावात आलो. तिथे मासे पोळ्या वगैरे जेवलो(मी) आणि दहीभात(सागर जैन).जेवणं होइपर्यंत ३:३० -४ काहीतरी वाजले
होते. हळेबीडला जाउन मुक्काम करायचं ठरलं.६० किमी च्या आसपासचं अंतर होतं.इथुन पुढे सागरनी गाडी चालवायला घेतली.तरीकेरेहुन कडुरपर्यंत NH-206 नी गेल्यावर उजवीकडे वळावं लागतं. ह्या रस्त्यानी चिकमंगलुरला जायचं.रस्त्यावरनं
जाताना १का ठिकाणी शहाळं प्यायला थांबलो. शहाळं केळी वगैरेचे २२ रु. झाले. माझ्याकडे सुटे पैसे नव्हते म्हणुन मी त्या आजीबाईना २५ रु दिले.१तर त्या निर्मनुष्य रस्त्यावर ती १कच झोपडी होती. मग मी त्याना उरलेले पैसे राहु द्या म्हणायच्या
आत त्याच मला राहुदे म्हणाल्या आणि मी वरचे ५ रुपये दिले तर त्यांनी इकडुन तिकडुन डब्यातुन शोधुन ३ रु दिले. कुठे हे लोक आणि कुठे बंगलोर मधले लोक .. किळसवाणेपणे 'चेंज इल्ला सार' असं म्हणतात तोंड वेंगाडत.
बिरुर कडुर चिकमंगलुर करत करत संध्याकाळी ८ च्या सुमारास हळेबीड ला पोचलो. मंदीराच्या अगदी जवळच कल्पतरु नावाचं लॊज आहे. स्वस्त आणि स्वच्छ आहे. तिथल्या स्वर्गातल्या गादीवर सगळी कोरड्या जमीनीवर पाय ठेवताना खरोखरच स्वर्गात असल्याचा भास होत होता. अर्धा तास नुसतेच गादीवर पडुन होतो. हात पाय धुवुन आवरुन मग बाहेर पडलो. जेवणासाठी शाकाहारी हॊटेल कुठे आहे का शोधत असताना काही लोकानी नांजुन्देश्वर नावाची मेस आहे असं सांगितलं जिथे पोळ्या मिळतात. मग का तिकडे जायालाच पाहिजे.शोधत शोधत तिथे पोचलो. पुणेरी वाडा टाइप घर होतं. लाकडी जिना ,मुख्य खोलीत पोचाच्या आधी छोटासा बोळ ,शहाबादी फ़रशी. आतल्या खोलीत ३ लाकडी टेबलं आणि
बाक होते. १ वयस्कर माणुस वाढत होता. आत गेल्या गेल्या कानडीतुन काहीतरी बोलला .. दोनच शब्द बाकी हावभाव. ते "चप्पल बाहेर" असं होतं .. आता असं पुणेरी वाडा टाइप वातावरण म्हटल्यावर माणुसही तसाच असणार .. जेवणाच्या शेवटी वाढायला भात घेउन आले.
सागर नुसताच वाट बघत होता .. मग ते म्हणाले "वाटी" .. त्याला काही कळेना आणि मी त्याच्याकडे होतो .. मग १दम वसकले "वाटी काढली नाही तर भात कुठे वाढु ?" मला जाम हसु येत होतं .. मग त्याला वाटी काढायला सांगुन त्यानी वाटी काढल्यावरच भात वाढला त्यानी ..मी
आधीच सावध होऊन वाटी बाहेर काढुन ठेवली होती. साग्या खरोखर serious होउन मला म्हणतो "विनाकारण कोणी माझ्यावर ओरडलेलं मला आवडत नाही" मी परत ख्या ख्या करुन हसलो ... जेवुन घरी आल्यावर गादीवर पडल्या पडल्या zzzz ...

९-०६-०८
सकाळी अरामात उठलो. उठेपर्यंत सोलर हीटरचं पाणी कोमट झालं होतं.उठुन आवरुन काही खायच्या मंदीरात जाउन यायचं ठरलं. सकाळी हवा १दम प्रसन्न होती. मंदीरात गेल्यावर उगचंच चार्जड झाल्यासारखं वाटंत होतं. मंदीराची जागा छान आहे.
बाजुलाच १ तलाव आहे आणि त्यात कुठलीही भेसळ नसल्यामुळे वास वगैरे काही नाही. थंड हवा वहात होती ढगही आलेले होतेच. गेल्यावर लगेच guide ठरवुन टाकला. मग त्यानी सांगायला सुरुवात केली. हळेबीडचं हे मंदीर होयसाळा राजाच्या

अमत्यानी बांधुन घेतलं होतं .. म्हणजे सुरुवात केली होती. १२व्या शतकात हे मंदीर बांधायला सुरुवात झाली. मंदीर पुर्ण म्हणजे आता दिसतं तसं व्हायला १९० वर्ष लागली. ५ पिढ्या हे मंदीर बांधत होत्या.एवढं होउनही मंदीर पुर्ण झालं नाही.

मुघलंनी(गझनीचा महमूद) इथे हल्ला केल्यावर कारगीरांना काम सोडुन पळावं लागलं.मंदीराचं बाहेरचं काम पुर्ण झालं आहे पण आतलं बरयापैकी अपुर्ण आहे.हळेबीडचं मंदीर हे आतल्यापेक्षा बाहेरुन सुंदर आहे त्याउलट बेल्लुरचं मंदीर हे आतुन जास्त सुंदर

आहे.हे मंदीर सोप्स्टोन वापरुन बांधलय. हा दगड म्हणे कोरीवकाम करायला सोपा असतो आणि वातवरणात एक्सपोज झाला की कठीण होत जातो.पुर्ण मंदीर हे दगड १मेकावर रचुन बांधलय. कुठलंही binding material न वापरता.
मंदीरातला कोरीव काम अतिशय नाजुक आणि सुंदर आहे. म्हणजे गळ्यात जर दोन हार असतील त्या दोन हारात खरच अंतर आहे म्हणजे फ़क्त दृष्य भाग नाही तर मागुनही ते व्यवस्थित कोरलेले आहेत.त्यातली १ मुर्ती आहे तिच्या चेह-यावर एवढं मस्तं

smile कोरलेलं आहे कि बघुन दंग व्हायला होतं.तशीच १ मुर्ती आहे नर्तिकेची .. तिच्या चेहे-यावर रुपाचा असणारा गर्व लगेच दिसतोच.बाकी
मग दृष्य जी सगळीकडे कॊमन असतात म्हणजे रामायण,महाभारत आणि दशावतार जे सगळ्या

ऐतिहासीक कोरीव कामांमध्ये हमखास सापडणारच. मंदीराच्या मुळ प्रवेशद्वारापाशी होयसाळांच राजचिन्ह आहे ते म्हणजे १ मुलगा काठीनी सिंहाशी लढतोय असं. त्याची गोष्ट अशी ..
एकदा १ मुनि मुलांना काहीतरी शिकवत होते.. तेव्हा तिथे अचानक १ सिंह आला .ते पाहुन सगळे विद्यार्थी पळायला लागले फ़क्त १कच तिथे थांबला सिंहाशी लढायला..तेव्हा गुरुजींनी त्याच्याकडे काठी फ़ेकली आणि म्हणाले होय(मार) साळा(विद्यार्थ्याचे

नाव). मग त्या मुलानी त्या सिंहाला मारलं (अर्थातच !! जर सिंहानी त्याला मारलं असतं तर त्यांचा वंश पुढे कसा गेला असता) .. आणि तोच ह्या घराण्याचा मुळपुरुष. हे लोक मुळचे जैन पंथाचे पण क्षत्रिय वृत्तीच्या जबाबदा-यांमुळे ते शैव झाले

का वैष्णव झाले. ते लक्षात नाही आता :( .हे मंदीर पाहुन झाल्यावर जवळच असलेलं १ जैन मंदीरही पाहुन घेतलं. राजाची राणी ही जैनच राहिली आणि तिनी हि मंदीरं बांधुन घेतली.जैनमंदीरं पाहुन आणि पोटपुजा आटोपुन आम्ही लॊज सोडलं आणि

बंगलोरकडे परत यायला निघालो.हासनहुन पुढे NH-48नी बंगलोरकडे येताना चन्नारयणपटणानंतर उजवीकडे गेलं की बाहुबलीची सर्वात उंच मुर्ती असणारं मंदीर आहे. वळुन थोडं पुढे गेलं की १का मोठ्या टेकडीवर ही मुर्ती दिसायला लागते.
टेकडीच्या पायथ्याशी गाडी लावली. पायथ्यापाशी cloak room वगैरेची सोय आहे. टेकडीला वरपर्यंत पाय-या असल्या तरी वर चढेपर्यंत चांगलीच दमछाक होते. पण आम्ही नेटानी १ दमात वरपर्यंत गेलो.वर गेल्यावर थंडगार वारं लागायला

लागतं. असं दमल्यावर तर कोणालाही तिथल्या १खाद्या झाडाखाली ताणुन द्यावी लागेल. आम्ही झोपलो नाही ते सोडा.मंदीराकडे यायच्या रस्त्यावर असलेलं हिरव्यागार पाण्याचं तळं वरुन नेट्कं आणि सुरेख दिसतं. मंदीरात थोडा वेळ घालवुन खाली

उतरलो. उतरल्यावर बंगलोरच्या दिशेनी निघालो. वाटेत १का ठिकाणी रस्त्याचं काम चालु आहे तिथे १का बाजुला मातीचा मोठा रस्ता आहे.तिथे गाडी लावुन पहुडलो .. गाडीचा आणि आम्हा तिघांचा १त्र पहिला फोटो तिथेच काढला.. ह्याची दृष्ट

लागाणार आहे हे काय माहित होतं ... इथुन सागरनी गाडी चालवायला घेतली. कुणीगलच्या ५-६ किमी आधी गाडी बंद पडली. किक मारुन पाहिली गाडी ढिम्म .. मग वाटलं नविन engine आहे तापलं असेल. सुदैवानी १का घराजवळ बंद

पडली होती. त्या घरातनं पाणी मागुन घेतलं आणि सागरसेठच्या diesel गाडीच्या exp.वरुन engineवर हलके हलके पाणी मारुन ते गार केलं. परत किक/बटन स्टार्ट ट्राय करुन पाहिलं पण engine अजुनही ढिम्मच ..आता काय

.. tool kitचं उद्घाटन केलं .. स्पार्क प्लगला ठिणगी येतिये का ते पाहिलं पण उहु .. मग हे हाताबाहेरचं प्रकरण आहे असा ठराव पास केला. घरातल्या १कानी गाव जवळच आहे असं सांगीतलं आणि गावातला मेकॆनिक ठिक करुन शकेल

असं सांगीतलं .. मग सागरला अजिबात कन्नड येत नसुन त्याला तुच गावात जा असं सांगीतलं .. कारण मी इरेला पेटलो होतो .. एवढी नविन गाडी जिची सतत स्तुती करतोय ती असं करुच कसं शकते .. त्याला पाठवलं आणि खटाटोप सुरु

केला. सागरला जाउन बराच उशीर झाला तरी साहेब येइनात .. फोन करावा म्हटलं तर नेट्वर्क नाही.फोनची बॆटरी संपत आलेली. त्यांमुळे नेटवर्क नसलेल्या ठिकाणी चालु ठेवण्यातही पोईंट नव्हता. घरातल्या १ सद्ग्रुहस्थानी मला १का झाडापशी नेलं

आणि म्हणे इथे n/w आहे. खरोखरच तिथे n/w होतं तिथुन साग-याला फोन टाकला. त्याल मेकॆनिक मिळाला होता.त्याला नेणार रिक्षावालाही भारी निघाला .. साग्यानी त्याला "कन्नड इल्ला" सांगितलं आणि गॆरेज असं सांगितल्यावर त्याने

ह्याला correct ठिकाणी आणुन सोडलं ..आणि पैसेही घेतले नाहीत(ह्याना बंगलोरला आणा रे कोणीतरी प्लीज) .. गडद काळोख झाला होत एव्हाना .. शेवटी १दाचा सागर आला. आलेल्या दोघानी थोडी खटाटोप करुन पाहिला पण त्यानाही

अंधारात काम करणं जमेना .. मग गाडी Tempoत टाकुन गावात न्यायचं ठरलं. मग tempo बोलावला ..मनातुन एवढा प्रचंड चिडलो होतो मी ... रक्तपात करावा असं वाटत होत तिथल्या तिथे.गावात १कच माणुस होता ज्याला बुलेटचं काम

करता येत होतं .. पण नेमकं त्याचं दुकान बंद .. मग परत गाडी जुन्या मेकॆनिककडे .. तिथे असा निष्कर्ष काढला त्यांनी की गाडी इथेच लावावी .. आणि दुस-या दिवशी बंगलोरहुन जो खराब झालेला पार्ट असेल तो घेउन यायचं.हे तर मी करणं

अशक्य होतं .. परत तोच tempoवाला बोलावला .. आणि गाडी tempoमध्ये टाकुन इकडे आणायचं ठरलं.एव्हाना रात्रीचे १० वाजले होते. मनस्ताप आणि श्रम ह्यामुळे खुप थकवा आला होता.दुपारनंतर काही खाणं झालं नव्हतं. गाडी

चढवायला त्या गॆरेजवाल्यानी मदत केली.त्याच्याकडे दोरी नव्हतीतर गाडीवरुन कुठेतरी जाउन दोरी घेउन आला.गाडी बान्धुन दिली आणि म्हणाला 'कुछ फ़िकर नक्को करो आरामसे सो जाओ अब गाडीक कुछ नई होता' एवढ सगळं त्यानी केलं म्हटल्यावर

त्याला काहीतरी पैसे देउ केले पण तो म्हणाला गाडी ठिक नही हुइ पैसे किस चीज़ के लेंगे ?? १कीकडे गाडीमुळे झालेली चिडचिड आणि दुस-या बाजुला अशी निरपेक्ष मदत करणारी लोकं .. हे आमच्या ऋण होतं .. कधीही कुठेही कोणालाही कसलीही

मदत लागली तर दिलीच पाहिजे .. hats off to those guys !!! tempo शेवटी ११:३० -१२ च्या सुमारास घरी पोचलो. काहीच कारायचा मूड नव्हता. थोडसं काहीतरी खाउन झोपलो.
ट्रीप अशी संपेल असं अजिबात वाटलं नव्हतं.. पण असं सगळं झालं तर काहीतरी वेगळं(नेहेमी नेहेमी नाही .. कधी कधी हा .. नाहीतर त्या वास्तुपुरुषाला नको तेव्हा तथास्तु म्हणायची सवय असते). तर ट्रीप इथे संपली ..


पण पुढे लिहीलंच पाहिजे ...सकाळी उठुन showroom ला फोन केल्यावर त्यानी service centerचा फोन दिला. फोन केल्यावर २०व्या मिनिटाला मेकॆनिक हजर होता .. त्यानी आम्हाला नविन माहिती दिली ..
आम्ही गाढव असल्याची .. "royal enfield gives free service for 1 year at any place and that to the service is 24hr service..
why didn't you give us a call from kunigal .. we would've come and brought ur vehicle here .. and thats without any cost, and

this kind of breakdown is on highest of the priorities.if we don't serve well we get commands from chennai head office.u can

check that on i-net" मनातल्या मनात स्वत:ला जोड्यानी हाणलं. अजुन दोन माणसाना बोलवुन ते लोक गाडी घेउन गेले. मीही गॆरेज बघायला म्हणुन बरोबर गेलो .. त्याच्या बुलेट्वरुन उतरताना माझी jeans कशाततरी

अडकुन फ़ाटली !!! time खराब और क्या म्हणलं आणि घरी आलो.. दुस-या दिवशी गॆरेजमधुन फोन आला की अश्याप्रकारचा problem पहिल्यांदाच report केला गेला आहे .. आणि आम्हाला तो का आला ते शोधुन

company-ला सांगावं लागेल(चला at least इथेतरी unique आहोत आपण) .. म्हणुन आम्ही गाडी आजचा दिवस test करुन उद्या परत
देतो ..आणि शेवटी ती गाडी परत आली सुखरुप ... अजुनही ही गाडी मला तेवढीच

आवडते .. आणि आवडत राहील.. आपलं माणुस आजारी पडलं तर नावडतं होत नाही ना तसंच ..इतके किमी गाडी चालवली पण १दाही जरा थांबुन पाठ मोकळी करावी असं वाटलं नाही ..
म्हणुनच .. म्हणुनच ही गाडी .. माझी डेक्कन ओडिसी !!!